विरोधी पक्षाला बळ देणारा मतदार संघ

विरोधी पक्षाला बळ देणारा मतदार संघ

१२ (निवडणूक पानासाठी, अँकर)

काही आठवणी .... लोगो


विरोधी पक्षाला बळ देणारा मतदार संघ

रत्नागिरी-सिंधुदुर्ग; देवगडपाठोपाठ रत्नागिरीत सत्ताधाऱ्यांचा प्रभाव

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : राजापूर लोकसभा मतदार संघाच्या इतिहासात जनतादलाचे तत्कालीन खासदार प्रा. मधू दंडवते यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. कालांतराने या मतदार संघावर शिवसेनेने प्राबल्य निर्माण केले. या दोन्ही जिल्ह्यात शिवसेनेने बहुमतांनी आपले उमेदवार निवडून आणले. या मतदार संघाने भाजपाला विशेष स्थान दिलेले नाही; पण शिवसेना-भाजपा युतीमार्फत अनेक ठिकाणी भाजपने झेप घेतली. देवगड मतदार संघात भाजपाचा जसा प्रभाव आहे तसा रत्नागिरी विधानसभा मतदार संघातही आहे; मात्र हे दोन्ही मतदार संघ भाजपाने विशेष लक्ष न दिल्यामुळे विरोधी पक्षाकडेच राहिले.
राजापूर लोकसभा मतदार संघ म्हणून पूर्वी ज्या मतदार संघाची ओळख देशात प्रथम क्रमांकाची होती तो मतदार संघ विभागणीनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. या मतदार संघाचे नेतृत्व संसदपटू बॅ. नाथ पै, प्राध्यापक मधू दंडवते, सुरेश प्रभू यांनी केले तसेच या मतदार संघाने कर्नल सुधीर सावंत, नीलेश राणे, विनायक राऊत यांना विजयी म्हणून निवडून दिले. २०१४, २०१९ आणि त्या पूर्वीच्या निवडणुकींचा इतिहास पाहिला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. कारण, या मतदार संघात अनेक समाजवादी नेत्यांनी आणि व्यक्तींनी समाजसुधारणेचे कार्य केले. कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन असो वा नानासाहेब वंजारे, नानासाहेब शेट्ये, नानासाहेब वणजू या मान्यवरांचा मोठा सामाजिक कार्याचा इतिहास या मतदार संघावर आहे. कणकवलीचे गोकुळी आश्रम वा देवरूखचे मातृमंदिर किंवा लांजाचे कुणबी छात्रालय या सामाजिक संस्था स्वातंत्र्यानंतर सामाजिक सेवेचे केंद्र म्हणून ओळखल्या जात होत्या.
राजापूर लोकसभा मतदार संघाने नेहमीच विरोधी पक्षाला बळ दिले आहे. कारण, विरोधात आपला उमेदवार आपल्यासाठी लढू शकतो, ही भावना प्रकर्षाने या मतदार संघाने वेळोवेळी दाखवून दिली आहे. सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधी पक्षाला प्राधान्य देणारा, असा राजापूर लोकसभा मतदार संघ आणि आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ नेहमीच विरोधी पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणारा अशी इतिहासात नोंद आहे. बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते, सुरेश प्रभू या तिघा खासदारांनी संसदेत या मतदार संघाला प्रथमस्थानी पोहचवले. त्याच मतदार संघात केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणेदेखील चांगले काम करत आहेत. खासदार म्हणून विनायक राऊत यांचे सर्वसामान्य जनतेशी असलेले नाते आणि लोकांच्या मदतीसाठी त्यांचा असणारा पुढाकार, सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारे विनायक राऊत यांची आपल्या खासदारकीची छाप मतदार संघावर आहे. डॉ. नीलेश राणे यांची खासदारकीची कारकीर्दही चांगली गेली. कर्नल सुधीर सावंत यांनी तर काँग्रेस पक्षाला पहिल्यांदाच येथे स्थान मिळवून दिले आणि ते खासदार म्हणून निवडून गेले. गेल्या काही वर्षामध्ये ठाकरेंच्या विचारांचा पगडा असलेला हा मतदार संघ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com