राजापूर - तालुक्यातील अणसुरे येथील संर्पदश झालेल्या महिलेवर जैतापूर-राजापूर-रत्नागिरी-डेरवण असा प्रवास केल्यानंतर तब्बल सुमारे तेरा तासानंतर उपचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये सुदैवाने ती महिला बरी झाली आहे. मात्र आरोग्य विभागाचा कारभार आणि त्या ठिकाणच्या उपलब्ध आरोग्य सुविधांबाबत लोकांमधून साशंकता आणि तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी उसंत घेतल्याने भातकापणीच्या कामांना सुरवात झाली आहे. या कालावधीत लोकांना संर्पदंश, विंचूदंश यांचा सामना करावा लागत आहे. अशातच अणसुरे येथील एका महिलेला सर्पदंश झाल्याची घटना मंगळवारी घडली.
हे पण वाचा - माजी आमदारांचा भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश
तिच्या नातेवाइकांनी त्या महिलेला तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथून त्या महिलेला राजापूरला हलविण्यात आले. राजापूरहून रत्नागिरी आणि त्यानंतर तिला डेरवण येथे उपचारासाठी हलविण्यात आले. यामध्ये तब्बल सुमारे तेरा तासांचा प्रवास घडला. या प्रवासानंतर तिच्यावर उपचार झाले. सुदैवाने ती महिला सुखरूप आहे.
संपादन - धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.