Uday Samant statement on Aniket Tatkare election
esakal
रत्नागिरी : विधान परिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीत कोणतेही योगदान नाही. त्यावेळी माघारीविषयी कोणतीच माहिती मला दिलेली (Konkan MLC election political controversy) नव्हती. कोकणची जागा बिनविरोधच करायची होती, तर पालकमंत्री म्हणून मला कल्पना द्यायला हवी होती. पाच वेळा मी पराभूत केलेल्या त्या उमेदवाराबाबत एवढा मोठा निर्णय घेताना मला विश्वासात घेणे किंवा पूर्वकल्पना देणे गरजेचे होते, अशा शब्दांत पालकमंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली.