

Uday Samant
esakal
राजापूर: परभणी येथील शिवसेनेचा शेतकरी व युवा संवाद मेळावा हा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा मराठा आरक्षणात अडथळा निर्माण करण्यासाठी आयोजित केला नव्हता. हा मेळावा दोन महिन्यांपूर्वीच नियोजित होता. त्यामुळे मनोज जरांगे यांनी गैरसमज करून घेऊ नये, असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. राजापूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘परभणी येथील मेळावा ७ जुलैला होणार होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो पुढे ढकलला. जरांगे पाटील यांचे उपोषण