वावेघर ग्रामस्थ पाणी टंचाईमुळे त्रस्त 

वावेघर ग्रामस्थ पाणी टंचाईमुळे त्रस्त 

रसायनी (रायगड) - वाढती लोकसंख्या आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रसायनीतील वावेघर ग्रामपंचायतीच्या हद्दितील गावांतील ग्रामस्थ पाणी टंचाईमुळे त्रस्त झाले आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एमआयडीसीने जास्त व्यासाच्या वाहिनीने पाणी पुरवठा करावा आशी मागणी आमदार मनोहर भोईर यांनी आणि ग्रामस्थांनी मंगळवार (30) रोजी मंत्रालयात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.  

यावेळी आमदार मनोहर भोईर, वावेघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास माळी, शिवसेना गुळसुंन्दा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर माळी, उरण तालुका प्रमुख संतोष ठाकुर, गावातील ग्रामस्थ मनोज पवार, हेमंत गायकर, गणेश गायकर आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मंत्री मोहोदयांना मागणीचे निवेदन दिले आहे. 

वावेघर ग्रामपंचायतीच्या हद्दित वावेघर, दापिवली, वावेघर झोपडपट्टी आदि गाव मोडत आहे. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात आणि क्षेत्रा बाहेर झपाट्याने औद्योगिक विकास होत असल्याने ग्रामपंचायतीच्या हद्दितील गावांची लोकसंख्या वाढली आहे. सुमारे दहा हजार  लोकसंख्या आहे. लोकसंख्याच्या तुलनेत पाण्याचा कोठा वाढला नाही, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला तोंड दयावे लागत आहे. पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन पाण्याचा कोठा वाढुन मिळावा आणि जास्त व्यासाची जलवाहिनी टाकण्याची एमआयडीसी कडुन परवानगी मिळावी  आशी मागणी करण्यात आली असल्याचे ज्ञानेश्वर माळी यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com