
देहरादून येथे सुरू असलेल्या ३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो खेळाच्या स्पर्धा संचालकांना ‘मॅच फिक्सिंग’चे खोटे आरोप करून ‘जीटीसीसी’ने पदावरून हटविले होते.
याविरोधात तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली, उच्च न्यायालयात कुठलाही पुरावा देता न आल्याने, उच्च न्यायालयाने स्पर्धेचे संपूर्ण अधिकार तायक्वांदो स्पर्धा संचालकांना व ‘टीएफआय’ला पुन्हा बहाल करण्याचा निर्णय दिला आहे.