SA vs IND : विराट फसलाय की; BCCI ठरवून त्याला खोटं पाडतंय?

Virat Kohli And BCCI
Virat Kohli And BCCISakal

Chetan Sharma On Virat Kohli Captaincy : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विराट कोहलीवर (Virat Kohli) आणखी एक वार केलाय. बीसीसीआय निवड समितीचे मुख्य अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या सूरात सुर मिसळत कोहलीला खोट ठरवणारे वक्तव्य केले आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विराट कोहलीने 20 टी संघाचे नेतृत्व सोडले. त्यानंतर त्याला वनडेची कॅप्टन्सी सोडावी लागली. रोहित शर्माकडे वनडेचं नेतृत्व आले. या घडामोडींनंतर भारतीय क्रिकेटमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

मर्यादीत षटकांसाठी दोन कॅप्टन योग्य नाही. याच उद्देशातून रोहित शर्माकडे वनडेचं नेतृत्व दिले. टी-20 संघाचे नेतृत्व सोडू नये. यावर पुन्हा एकदा विचार करावा, अशी चर्चा विराट कोहलीशी केली. पण तो आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने त्याच्याकडून वनडे संघाच नेतृत्व काढून घ्यावे लागले, अशा आशयाचे वक्तव्य गांगुलींनी केले होते. ही गोष्ट इथेच थांबली नाही. यावर विराट कोहलीने मला अशी कोणतीच विचारणा करण्यात आली नव्हती असे म्हटले होते. त्यामुळे कोण खरं बोलतंय आणि कोण खोट असा प्रश्न निर्माण झाला. यात आता आणखी एक भर पडली आहे.

Virat Kohli And BCCI
SA VS IND : रोहित आउट; KL राहुल बनला कॅप्टन; असा आहे वनडे संघ

बीसीसीआय निवड समितीचे मुख्य अध्यक्ष चेतन शर्मा यांनीही विराटच्या कॅप्टन्सीवर भाष्य केले आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा झाली. यावेळी चेतन शर्मा यांनी कॅप्टन्सी बदलाच्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले की, कोहलीला याबाबत माहिती दिली होती. टी-20 संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर बोर्ड मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी वेगळा आणि कसोटीसाठी वेगळा कर्णधारटा विचार करत आहे. याचा टीम इंडियाला फायदा होईल. याबद्दल कोहलीशी चर्चा केली होती. चर्चा सकारात्मक झाल्यानंतरच निर्णय घेण्यात आला, असे चेतन शर्मा यांनी म्हटले आहे.

Virat Kohli And BCCI
2021 बेस्ट टेस्ट संघ ऑस्ट्रेलियाचा; रोहितसह भारतीयांचा चौकार!

विराट कोहलीचा निर्णय आश्चर्यचकित करणारा

विराट कोहलीने अचानकपणे टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वर्ल्ड कप स्पर्धेला प्रभावित करेल त्यामुळे यावर जी काही चर्चा असेल ती वर्ल्ड कपनंतर करु, असे आमचे मत होते. असेही चेतन शर्मा म्हणाले आहेत. विराट कोहलीनं कॅप्टन्सी सोडल्यानंतर सर्व पाच सदस्य मर्यादित आणि कसोटी संघासाठी वेगळा कर्णधार असावा, या बाजूनं झुकले. विराटला वनडेतून काढून टाकणे हा बोर्डाचा निर्णय होता. पण त्याने टी-20 संघाची कॅप्टन्सी सोडल्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला, असे चेतन शर्मांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com