...म्हणून धोनीला सातव्या स्थानावर पाठविले : शास्त्री

Ravi Shastri
Ravi Shastri

लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात येऊन आता परतीचा प्रवास सुरू झाला, तरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबलेल्या नाहीत. महेंद्रसिंह धोनीच्या क्रमांकावरून महाभारत रंगू लागलेले असताना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवायचे, हा निर्णय माझा वैयक्तिक नसून संघव्यवस्थापनाचा होता, असे सांगून जबाबदारी टोलावली. 

240 धावांच्या आव्हानाला पाठलाग करताना 3 बाद 5 अशी अवस्था झालेल्या भारतीय संघाचा डाव रवींद्र जडेजा (77) आणि महेंद्रसिंह धोनी (50) यांनी सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी करून सावरला होता; पण अंतिम निर्णायक क्षणी जडेजानंतर धोनीही बाद झाल्यामुळे भारताचे प्रयत्न 18 धावांनी तोकडे पडले होते. 

भारताची फलंदाजी कोलमडत असताना धोनीला दिनेश कार्तिकनंतर फलंदाजीस पाठवण्यात आले. धोनीच्या अगोदर आलेल्या हार्दिक पंड्याबाबतही प्रश्‍नचिन्ह उभे करण्यात आले आहे. धोनीला फलंदाजीसाठी कोणत्या क्रमांकावर पाठवायचे, हा संघव्यवस्थापनाचा निर्णय होता, हे सर्वांना माहीत आहे. धोनीला वरच्या क्रमांकावर पाठवले असते आणि तो बाद झाला असता, तर त्या वेळीही आम्हालाच जबाबदार धरण्यात आले असते, असे शास्त्री यांनी म्हटले आहे. 

निर्णायक आणि अंतिम टप्प्यात अनुभवी फलंदाज असावा, असा आम्ही विचार केला. तो सर्वोत्तम फिनिशर आहे, हे सर्वांनाच माहीत आहे आणि अशाक्षणी त्याचा उपयोग न करून घेणे ही सर्वांत मोठी चूक ठरली असती, अशीही पुष्टी शास्त्री यांनी जोडली आहे. 

चौथ्या क्रमांकाबाबत चिंता कायम 
फलंदाजीच्या चौथ्या क्रमांकाबाबत प्रश्‍न सुटलेला नसल्याचे शास्त्री यांनी मान्य केले. या क्रमांकावर भक्कम क्षमतेचा फलंदाज असायला हवा. आम्ही या क्रमांकावर अनेक पर्याय तपासून पाहिले; पण उत्तर सापडले नाही, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com