सचिनच्या त्या पर्यायाला दिलीप वेंगसरकर यांची असहमती

Dilip-and-Sachin
Dilip-and-Sachin

पिंपरी - एका सुपर ओव्हरमध्ये कुठला संघ सरस आहे हे ठरू शकत नाही. त्याऐवजी स्पर्धेतील दोन्ही संघांच्या अंतिम फेरी पर्यंतची एकूण कामगिरी लक्षात घेतली पाहिजे“, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. 

विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामना बरोबरीत सुटल्यावर विजेता संघ ठरे पर्यंत सुपर ओव्हर खेळविण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे ने घेतला आहे. सर्वप्रथम विक्रमवीर सचिन तेंडुलकरने तसा पर्याय सुचविला होता. मात्र, त्याला वेंगसरकर यांनी असहमती दर्शविली आहे. 

वेंगसरकर म्हणाले, "निर्धारित ५० षटकांच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हर  खेळविण्यापेक्षा दोन्ही संघांचा अंतिम फेरी पर्यंतची कामगिरी लक्षात घेतली गेली पाहिजे. अंतिम सामन्यापर्यंत कोणत्या संघाने अधिक बळी गमाविले, किती धावा केल्या, किती सामने जिंकले आणि किती सामने हरले. त्यांची सरासरी काय? या सर्व बाबींचा विचार केला गेला पाहिजे. अन्यथा एका षटकात काहीही होऊ शकते. कमजोर संघ विजेता ठरून बलाढ्य संघाला पराभवाला सामोरे जावे लागू शकते.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com