Cricket New Rule: रिषभ पंतची दुखापत अन् बीसीसीआयने बदलला क्रिकेटचा 'तो' नियम; आता मॅच पाहायला मजा येणार

Rishabh Pant injury leads to BCCI rule change : रिषभ पंतच्या दुखापतीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अखेर एक मोठा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंत दुखापतग्रस्त झाल्यानंतर टीम इंडियाला १० फलंदाजांसह खेळावे लागले असते. यामुळे केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेट विश्वाला हा मुद्दा विचार करायला लावणारा ठरला.
BCCI introduces Serious Injury Replacement rule
BCCI introduces Serious Injury Replacement ruleesakal
Updated on
Summary
  • बीसीसीआयने बहुदिवसीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये Serious Injury Replacement नियम लागू केला आहे.

  • या नियमानुसार सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झालेल्या खेळाडूच्या जागी like-for-like खेळाडू उतरवता येईल.

  • दुखापत फ्रॅक्चर, कट, विस्थापनासारखी गंभीर असावी आणि ती सामन्यातील खेळादरम्यान झालेली असावी.

BCCI serious injury replacement rule in domestic cricket: भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राखली असली तरी या मालिकेत एक प्रश्न उपस्थित झाला होता. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. तो यष्टीरक्षक करू शकला नव्हता, परंतु इंजेक्शन घेऊन फलंदाजीला आला. त्याने तसे केले नसते तर भारताला १० फलंदाजांसहच खेळावे लागले असते. आयसीसीच्या नियमानुसार कन्कशन झालेल्या खेळाडूलाच बदली खेळाडू दिला जातो. रिषभच्या दुखापतीमुळे नियम बदलण्यावर बरीच चर्चा झाली आणि आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) नेच पुढाकार घेत नियम बदलला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com