

India vs Pakistan
Sakal
Alastair Cook Claims India-Pakistan Tension is 'Only for Show': भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघातील सामना नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कट्टर प्रतिस्पर्ध्यी असलेल्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष असते. त्यातच गेल्या वर्षभरात या दोन संघातील कटूपणा आणखी वाढलेला दिसला.
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यात भारतीय नागरिकांनी प्राण गमावले. यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंधही आणखी बिघडले. भारताने ऑपरेशन सिंदूरमार्फत पाकिस्तानमधील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. दोन्ही देशांत युद्धजनक परिस्थितीही निर्माण झाली होती.