
गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) परदेशी आजी-माजी खेळाडूंच्या निशाण्यावर आहे. नुकतीच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने स्पर्धा हायब्रिड मॉडेलने खेळवण्यात आली.
महत्वाचे म्हणजे भारतीय संघाचे या स्पर्धेतील पाचही सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम या एकाच ठिकाणी पार पडले.