

Abhishek Sharma
Sakal
Coach Kotak Confident in Abhishek Sharma's Aggressive Intent': टी२० विश्वकरंडक २०२६ स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत तीन सामने खेळले आहेत. तिन्ही सामन्यात विजय मिळवून सुपर ८ फेरीही गाठली आहे. या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात अभिषेक शर्मा खेळला, मात्र या दोन्ही सामन्यात तो शून्यावर बाद झाल्याने त्याच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सुतांशू कोटक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारताला पहिल्या फेरीतील अखेरचा सामना नेदरलँड्सविरुद्ध बुधवारी खेळायचा आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला कोटक बोलत होते.