

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कडक नियम लागू केले. बीसीसीआयने लागू केलेल्या नियमांमध्ये दौऱ्यादरम्यान कुंटुंबियांच्या सोबतीबाबतही अटी घालण्यात आल्या आहेत.
हे नियम त्वरित लागूही करण्यात आले आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी नियमानुसार खेळाडूंसोबत कुटुंबातील कोणताही सदस्य दुबईला आलेला नाही. पण आता बीसीसीआय या नियमात खेळाडूंना थोडी सुट दिली आहे, असं समजत आहे. मात्र, त्यातही एक अट घालण्यात आली आहे.