

BCCI urges Team India to focus on Test cricket
esakal
Why BCCI wants Jasprit Bumrah to play full WTC cycle? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय खेळाडूंना कसोटी क्रिकेटला गांभीर्याने घेण्याचा सल्ला दिला आहे आणि त्यांनी प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील उर्वरित सर्व सामने खेळण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांचा समावेश आहे. भारतीय संघाला WTC मध्ये संघर्ष करावा लागतोय आणि ते तालिकेत सहाव्या क्रमांकावर आहेत. BCCI ने कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे आणि त्यासाठी बुमराहने काही वन डे मालिका चुकवल्या तरी त्यांना हरकत नाही.