
आयपीएल २०२५ स्पर्धा संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाला ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
शुभमन गिल भारताचा नवा कसोटी कर्णधार आहे. तसेच त्याच्यासोबत ऋषभ पंत कसोटी संघाचा नवा उपकर्णधार आहे. त्यामुळे आता त्यांच्यासमोर पहिलंच आव्हान इंग्लंड दौऱ्याचे आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी शुभमन गिल आणि भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे.