Champions Trophy: टीम इंडिया जिंकली पाकिस्तानची नाचक्की झाली! जगात याजमानांची अशी लाज नव्हती गेली

Champions Trophy final Dubai: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
India vs Australia | Champions Trophy
India vs Australia | Champions TrophySakal
Updated on

भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश पक्का केला आहे. मंगळवारी (४ मार्च) दुबईला झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया संघाला ४ विकेट्सने पराभूत केले. भारताने एकूण पाचव्यांदा, तर सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

भारतीय संघ आता तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यास सज्ज आहे. यापूर्वी भारताने २००२ साली श्रीलंकेसह संयुक्तरित्या पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर २०१३ साली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर आता १२ वर्षांनी पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी भारताकडे आहे.

India vs Australia | Champions Trophy
IND vs AUS: विराटच्या शतक हुकल्याची खंत; पण भारत फायनलला गेल्याचा आनंद! १२ वर्षांनी इतिहास घडवण्यासाठी सज्ज
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com