Gautam Gambhir dedicates T20 World Cup to Rahul Dravid and VVS Laxman
esakal
Team India coach Gautam Gambhir reaction after World Cup win: भारतीय संघाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताने आज २०२६ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा पराभव करून जेतेपदाची ट्रॉफी कायम राखली. सलग दोन वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला. गौतम गंभीरने या संघात व्यक्तिपूजेला फाटा देत संघहिताला महत्त्व दिले आणि त्याने काही कठोर निर्णयही घेतले. पण, आज या विजयाने त्याच्या सर्व रणनीतीला यश प्राप्त झाले. मात्र या विजयानंतर गौतमने तीन लोकांना ही ट्रॉफी समर्पित केली.