

Gautam Gambhir
Sakal
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी भारताने सुपर - ८ फेरीत वेस्ट इंडिजला ५ धावांनी पराभूत केले. कोलकातामधील ईडन गार्डन्सवर हा सामना झाला होता.
या सामन्यात भारताच्या विजयात संजू सॅमसनचे योगदान मोठे राहिले. पण असे असले तरी संघातील प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे होते, असं सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने म्हटले आहे.