

Hardik Pandya | MI vs RCB | IPL 2026
Sakal
MI vs RCB, Marathi News: मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (१२ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा हा पहिल्या ४ सामन्यांतील सलग तिसरा पराभव आहे.
मुंबईने या हंगामात पहिला सामना जिंकला होता. पण नंतरचे तिन्ही सामने मुंबईने पराभूत झाले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) समोरील आता आव्हान आणखी कठीण झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल, असं हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सामन्यानंतर सांगितले आहे.