Harry Brook cooked Gautam Gambhir: भारत-इंग्लंड मालिकेत कसोटी क्रिकेटची मजा काय असते हे सर्वांनी अनुभवले.. मालिकेतील पाचही सामने पाचव्या दिवसापर्यंत खेळले गेले. इंग्लंडने ही मालिका ३-१ अशी जिंकणे अपेक्षित होतं, परंतु टीम इंडियाने कडवी टक्कर दिली आणि मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. लॉर्ड्सवरील विजय थोडक्यात हुकल्यानंतर दी ओव्हलवर भारताने इंग्लंडच्या जबड्यात हात घालून विजय खेचून आणला. मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) व प्रसिद्ध कृष्णा या सामन्यातली नायक ठरले.