
भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर तेंडुलकर-अँडरस ट्रॉफी खेळत आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला हेडिंग्लेमध्ये पाचव्या दिवसाच्या शेवटच्या दिवशी पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे इंग्लंडने ५ विकेट्सने मिळवलेल्या विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
पहिल्या सामन्यात भारताकडून ५ शतके झाली होती. पण त्यानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. कसोटी इतिहासात ५ शतकांनंतरही पराभूत होणारा भारत पहिलाच संघ ठरला. अशातच आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला असून एका खेळाडूला पुन्हा मायदेशी परतावे लागणार आहे.