T20 World Cup 2026: ICC ने स्पष्ट नकार दिला तरी बांगलादेशचा तोरा कायम! आता जय शाह वापरणार शेवटचा पर्याय, अन्यथा...

ICC Rejects BCB’s Request of Venue Changes: टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी बांगलादेशने भारतात न जाण्याची भूमिका घेतली आहे, परंतु आयसीसीने त्यांची दुसऱ्यांदा मागणी फेटाळली आहे.
ICC Rejects BCB’s Request of T20 World Cup Venue Changes

ICC Rejects BCB’s Request of T20 World Cup Venue Changes

Sakal

Updated on

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणाव कायम आहे. काही दिवसांपूर्वीच बांगलादेशमधील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानला आयपीएल २०२६ मधून बाहेर केले आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाला त्याला काढून टाकण्याची निर्देश देण्यात आले होते. पण त्यानंतर दोन देशातील क्रिकेट संबंध आणखी बिघडल्याचे दिसत आहे.

या घटनेनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरक्षेचं कारण देत संघाला टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतात पाठवणार नसल्याचे जय शाह यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) कळवले. मात्र आयसीसीने त्यांची ही विनंती आता मंगळवारी (१३ जानेवारी) पुन्हा फेटाळली आहे.

<div class="paragraphs"><p>ICC Rejects BCB’s Request of T20 World Cup Venue Changes</p></div>
T20 world cup 2026: बांगलादेशची मागणी धुडकावली; भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे ठिकाण रद्द करण्यास ICCचा नकार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com