IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया पुन्हा आमने-सामने; २१ दिवसांत आठ सामन्यांची मालिका

India vs Australia : यंदा भारत व ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर यादरम्यान २१ दिवसांच्या कालावधीत वन-डे व ट्वेंटी-२० मालिकांचे आयोजन करण्यात आले आहे.
India vs Australia
India vs Australiaesakal
Updated on

India vs Australia : काही महिन्यांपूर्वीच भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. आता पुन्हा एकदा भारत-ऑस्ट्रेलिया हे दोन देश आमने-सामने उभे ठाकणार आहेत. यावर्षी (२०२५) १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर यादरम्यान २१ दिवसांच्या कालावधीत दोन देशांमध्ये तीन एकदिवसीय व पाच टी-२० असे आठ सामने खेळवण्यात येणार आहेत. उभय देशांमधील ही मालिका ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com