
भारत विरुद्ध इंग्लंड संघात टी२० मालिकेतील पहिला सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांची शानदार कामगिरी झाली. त्यामुळे इंग्लंडला भारतासमोर केवळ १३३ धावांचे लक्ष्य ठेवता आले आहे. तरी इंग्लंडकडून कर्णधार जॉस बटलरने एकाकी झुंज दिली.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडकडून बेन डकेट आणि फिलिप सॉल्ट यांनी डावाची सुरूवात केली.