IND vs SA 2nd ODI: भारतीय संघ ३५८ धावा करूनही कसा हरला? पाच खेळाडू जबाबदार...

India vs South Africa 2nd ODI: भारताने रायपूरमध्ये ३५८ धावांचा भलामोठा डोंगर उभा केला होता. विराट कोहली, ऋतुराज गायकवाड आणि मधल्या फळीतील महत्त्वाच्या खेळाडूंनी फलंदाजीची जबाबदारी उत्तम पार पाडली. पण, एवढा भक्कम स्कोअर असूनही भारतीय संघाचा पराभव झाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला.
India lose the 2nd ODI despite posting 358 runs

India lose the 2nd ODI despite posting 358 runs

esakal

Updated on

India vs South Africa 2nd ODI Marathi Update : दक्षिण आफ्रिकेने रायपूर येथे ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने विजयासाठी ठेवलेले ३५९ धावांचे लक्ष्य त्यांनी चार विकेट्स व ४ चेंडू राखून सहज पार केले. वन डे क्रिकेटमधील हा त्यांचा परदेशातील सर्वात मोठा लक्ष्याचा पाठलाग ठरला. विराट कोहली व ऋतुराज गायकवाड यांच्या शतकांना आफ्रिकेच्या एडन मार्करमने ११० धावा करून उत्तर दिले. त्याला तेंबा बावुमा, मॅथ्यू ब्रित्झकी, डेवॉल्ड ब्रेव्हिस व कॉर्बिन बॉश यांची साथ मिळाली. आफ्रिकेने हा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. भारताच्या या पराभवाला पाच खेळाडूंचे अपयश कारणीभूतग ठरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com