
भारताचा अ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर चार दिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना कँटबरीमध्ये झाला. पण हा सामना अखेरच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (२ जून) अनिर्णित राहिला. सामन्यात भारताच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. मात्र पहिल्या सामन्यात गोलंदाजांना फरसा प्रभाव पाडता आला नाही.
या सामन्यात भारताने दुसऱ्या डावात ४१ षटकात २ बाद २४१ धावा केल्यानंतर दोन्ही संघांच्या संमतीने हा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात चौथ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावातील १२५ षटकापासून ७ बाद ५२७ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी जमान अख्तर नाबाद होता.