
भारत आणि इंग्लंड संघात सध्या लॉर्ड्सवर कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरू आहे. पण या सामन्यात दोन्ही संघांमध्ये गरमागरमी झाल्याचेही दिसले. या सामन्यात वेळ वाया घालवण्यावरून तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाच्या अखेरीस दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसले होते. याचदरम्यान आता सिराजला चौथ्या दिवशी आक्रमक सेलीब्रेशन करणे महागात पडले आहे.