

भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी दुबईमध्ये आहे. या स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळताना भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेश, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाला पराभूत केले आहे.
दोन्ही शेजाऱ्यांना पराभूत केल्यानंतर भारताने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. यानंतर आता भारताला साखळी फेरीत अखेरचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर उपांत्य सामना होईल.