
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताला पुढच्या महिन्यात (ऑगस्ट) बांगलादेशचा दौरा करायचा होता. पण हा दौरा सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे हा दौरा स्थगित करण्यात आला आहे, याबाबत दोन्ही बोर्डांकडून माहिती देण्यात आली आहे.
तसेच ही मालिका आता सप्टेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या भारताला वनडे मालिका थेट ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळायची आहे. त्यामुळे भारतासाठी ऑगस्ट महिन्यातील कालावधी रिकामा झाला आहे. त्यामुळे आता या कालावधीत बीसीसीआय दुसरी मालिका घेण्याचा विचार करत आहे.