
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. २०२३ वनडे वर्ल्ड कप गमावल्यानंतर भारतीय संघाने आयसीसी स्पर्धांमध्ये दमदार पुनरागमन करताना आठ महिन्याच्या अंतरात दोन आयसीसी विजेतीपदं जिंकली आहेत.
दरम्यान, २०२४ टी२० वर्ल्ड कप भारताने जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरही हे तिघे वनडेतून निवृत्त होणार की काय, अशी धाकधुक चाहत्यांच्या मनात होती.
मात्र रविवारी विजेतेपद मिळवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कोणीही निवृत्त होत नसल्याचे सांगत सर्वांना दिलासा दिला.