

Team India
Sakal
Team India T20 WC Semifinal Qualification Scenario: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात फलंदाजांनी घालीन लोटांगण केल्यानंतर टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ अस्तित्व टिकविण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यातच वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेवर शतकी धावांनी विजय मिळविल्यामुळे भारताची उपांत्य फेरीची वाट अधिकच बिकट झाली आहे.
पुढच्या शिल्लक असलेल्या सामन्यांत काय होईल यापेक्षा गुरुवारी दुपारी तीन वाजता सुरू होणारा दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.