IND VS AUS WOMEN’S WORLD CUP SEMI-FINAL: RAIN THREAT OVER NAVI MUMBAI CLASH – WILL RESERVE DAY SAVE THE GAME?
esakal
India vs Australia Women’s World Cup semi-final clash : भारतीय महिला संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना पावसामुळे रद्द करावा लागला. बांगलादेशविरुद्धच्या या लढतीनंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला गेला. आता हरमनप्रीत कौरचा संघ उपांत्य फेरीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यासह इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांनीही उपांत्य फेरीत धडक दिली आहे. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर ३० ऑक्टोबरला IND vs AUS Semi Final सामना होणार आहे. पण, त्या सामन्यावर पावसाचं सावट आहे आणि हा पाऊस टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो.