IND vs SL Final: भारताने जिंकलं तिरंगी मालिकेचं विजेतेपद; फायनलमध्ये श्रीलंकेला पाजलं पराभवाचं पाणी

India Women Won tri-series: भारतीय महिला संघाने श्रीलंकेला तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली. या विजयात स्मृती मानधना आणि स्नेह राणाने महत्त्वाची भूमिका बजावली.
Indian Women Cricket Team
Indian Women Cricket TeamSakal
Updated on

रविवारी (११ मे) भारतीय महिला संघाने तिरंगी वनडे मालिकेचे विजेतेपद पटकावले आहे. श्रीलंकेत श्रीलंका, भारत आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशात ही तिरंगी मालिका खेळवण्यात आली होती.

या तिरंगी मालिकेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका महिला संघात रविवारी आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडला. या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला ९७ धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावले. या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू स्नेह राणा ठरली, तर अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू स्मृती मानधना ठरली.

Indian Women Cricket Team
Smriti Mandhana Century: सांगली एक्सप्रेस सुस्साट...! फायनलमध्ये शतक ठोकत कोणालाच न जमलेला केला पराक्रम
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com