
श्रीलंकेमध्ये नुकतीच महिला तिरंगी वनडे मालिका खेळवण्यात आली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत भारत आणि श्रीलंका संघांनी अंतिम सामन्यात स्थान मिळवला.
भारत आणि श्रीलंका महिला संघात रविवारी (११ मे) अंतिम सामना आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने शतक करत मोठा पराक्रम केला आहे.