Mohammad Amir makes a bold prediction about India’s chances in the T20 World Cup.
esakal
Amir controversial statement on Team India: पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीर याने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणार नाही, असा दावा करून तोंडावर आपटल्यानंतरही आमीरने आता एक नवा दावा केला आहे. भारतीय संघ फायनल खेळणार नाही, असे त्याचे म्हणणे आहे आणि आता त्याला सोशल मीडियावर नेटिझन्स झोडत आहेत. भारतीय संघाने इडन गार्डनवर वेस्ट इंडिजवर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतरही आमीरला ट्रोल केले गेले.