MOHAMMED AMIR CLAIMS INDIA WILL MISS T20 WORLD CUP SEMI FINAL
esakal
Mohammed Amir says India will not qualify for T20 WC semi : भारत-पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका होत नसली तरी आयसीसी स्पर्धांमध्ये उभय संघ नेहमी समोरासमोर येतात. India vs Pakistan सामन्याला क्रिकेटविश्वात खूप मागणी असते आणि त्यामुळेच आयसीसी उभय संघांना एकाच गटात ठेवते. या दोघांच्या सामन्याची चर्चा बहरत असते आणि पाकिस्तानचे माजी खेळाडू भारतीय संघावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. सध्या सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही दोन्ही संघ सुपर ८मध्ये पोहोचले आहेत आणि पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमिर याच्या मते भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणार नाही.