
रविवारचा दिवस (९ मार्च) भारतीय क्रिकेट संघासाठी आणि चाहत्यांसाठी अविस्मरणीय दिवस ठरला. भारताने १२ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. भारतीय संघाने रविवारी रोहित शर्माच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जिंकली.
दुबईला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ४ विकेट्सने पराभूत केल. भारताचे हे एकूण सातवे विजेतेपद आहे. तसेच एकूण तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आहे.