Hardik Pandya Flies to Raipur
esakal
Why Mumbai Indians are unsure about Hardik Pandya? मुंबई इंडियन्सची इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील कामगिरी निराशाजनक झालेली आहे. त्यांना १० सामन्यांत केवळ ३ विजय मिळवता आले आहेत आणि ६ गुणांसह ते नवव्या क्रमांकावर आहेत. या परिस्थितीत उर्वरित चार सामने जिंकून ते १४ गुणांपर्यंत पोहोचतील आणि प्ले ऑफसाठी ही गुणसंख्या पुरेशी नाही. पण, हे उर्वरित चार सामने हार्दिक पांड्याच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. हार्दिकच्या नेतृत्वाखाली MI चा संघ तिसरे पर्व खेळतोय आणि पाचवेळच्या विजेत्यांना काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी होतेय.