

Kavya maran
esakal
Why IPL matches have high scoring 200 plus totals analysis? इंडियन प्रीमिअर लीग २०२६मध्ये आता २६४ धावाही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. दिल्ली कॅपिटल्सने ठेववेले हे सर्वात मोठे लक्ष्य पंजाब किंग्सने अगदी सहज पार केले. आयपीएलच्या मागील ४-५ पर्वात पाहिले, तर दोनशे धावांपेक्षा कमी धावा एखाद्या संघाने केल्या, तर तो सामना रटाळ वाटायला लागतो. त्यामुळेच गोलंदाजांवर दया माया न दाखवता फलंदाज चौकार-षटकारांचा पाऊस पाडताना दिसत आहेत. पण, याने गोलंदाजांचे खच्चीकरण होत आहे. यात नेमक क्रिकेटचा विकास होतोय का? हा खरा प्रश्न आहे आणि यावर सनरायझर्स हैदराबाद संघाचा स्पिन गोलंदाज प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन ( Muttiah Muralitharan) याने मोठे विधान केले आहे.