
Jammu-Kashmir Cricket Team: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेत जम्मू-काश्मीरने मोठा उलटफेर केला. जम्मू-काश्मीर संघाने बलाढ्य मुंबई संघाला तीनच दिवसात ५ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला.
अनेक स्टार खेळाडूंच्या उपस्थितही मुंबईला पराभवाचा धक्का बसला होता. दरम्यान, या सामन्यात जम्मू-काश्मीरच्या शानदार खेळासोबतच खराब अंपायरींगची बरीच चर्चा झाली. अंपायर्सने दिलेले काही निर्णय वादग्रस्त ठरले.
बीकेसीमधील शरद पवार क्रिकेट अकादमी येथे हा सामना झाला. या सामन्यानंतर जम्मू-काश्मीरने बीसीसीआकडे खराब कामगिरीबाबत अधिकृत तक्रार केल्याचे समजत आहे.