Ranji Trophy: इतिहास घडला! जम्मू-काश्मीर ठरले नवे चॅम्पियन; केएल राहुल, मयंक अगरवाल, पडीक्कलच्या कर्नाटकला दिली मात

Jammu & Kashmir Won Ranji Trophy: रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेचे विजेतेपद जम्मू-काश्मीर संघाने पटकावले आहे. कर्नाटकविरुद्धचा अंतिम सामना अनिर्णित राहिला, पण पहिल्या डावातील मोठ्या आघाडीसह जम्मू-काश्मीर नवे विजेते ठरले.
Jammu & Kashmir

Jammu & Kashmir

Sakal

Updated on

रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेचे विजेतेपद पारस डोगराच्या नेतृत्वातील जम्मू-काश्मीर संघाने मिळवले आहे. हुबळी येथे २४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान जम्मू-काश्मीरचा आठ वेळच्या विजेत्या कर्नाटकविरुद्ध अंतिम सामना झाला, जो अनिर्णित राहिला. या अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीरने शेवटच्या दिवशी (शनिवारी, २८ फेब्रुवारी) दुसरा डाव घोषित केला आणि विजेतेपदाचे सेलिब्रेशन केले.

या सामन्यात जम्मू-काश्मीरने (Jammu & Kashmir) पहिल्या डावात तब्बल २९१ धावांची आघाडी मिळवली होती. याच आघाडीमुळे सामना अनिर्णित राहिल्यानं जम्मू-काश्मीरला विजयी घोषित करण्यात आलं. नियमानुसार सामना अनिर्णित राहिल्यात पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या संघाला विजेते घोषित केले जाते.

<div class="paragraphs"><p>Jammu &amp; Kashmir</p></div>
Ranji Trophy: कर्नाटकच्या खेळाडूंचे अपशब्द; पारस डोगराची डोक्याने धडक, रणजी करंडक अंतिम सामना, जम्मू काश्‍मीरच्या ६ बाद ५२७ धावा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com