मुस्तफिजूरच्या हाकालपट्टीनंतर बांगलादेशचा संघ T20 World Cup भारतात खेळणार की नाही? BCCI च्या अध्यक्ष म्हणाले...

Mithun Manhas On Bangladesh Participation in T20 World Cup: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावामुळे मुस्तफिजूर रेहमानला आयपीएलमधून काढण्यात आले आहे. यानंतर आता टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी बांगलादेशचा संघ भारतात येणार की नाही, याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष मिथून मन्हास यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Bangladesh Cricket Team

Bangladesh Cricket Team

Sakal

Updated on

भारत - पाकिस्ताननंतर आता भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील संबंधही तणावपूर्ण झाले आहेत. याचा परिणाम क्रीडा क्षेत्रालाही बसत आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर आत्याचार होत असलेल्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे हे संबंध बिघडले असून आता भारतात बांगलादेश क्रिकेटलाही विरोध होत आहे.

आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ स्पर्धेत बांगलादेशच्या मुस्तफिजूर रेहमानला (Mustafizur Rahman) खेळवण्यावर बराच विरोध देशभरातून झाल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) त्याला संघातून काढून टाकण्याचे निर्देश कोलकाता नाईट रायडर्सला दिले होते. त्यानुसार मुस्तफिजूरला कोलकाता संघाने संघातून काढण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली.

<div class="paragraphs"><p>Bangladesh Cricket Team</p></div>
T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी बांगलादेशचा संघ भारतात येणार नाही? क्रिकेट बोर्ड ICCला पत्र लिहिण्याच्या तयारीत, काय करणार मागणी?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com