T20 World Cup 2026: Bangladesh May Not Travel to India
esakal
टी-२० विश्वकप ( T20 World Cup 2026 ) स्पर्धेतील बांगलादेशचे सामने भारताबाहेर आयोजित करावे, अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून करण्यात येणार आहे. यासंदर्भात आयसीसीला पत्र लिहिणार असल्याची माहिती आहे. बांगलादेश सरकारने (Bangladesh May Not Travel to India ) तसे निर्देश क्रिकेट बोर्डाला दिले आहेत. भारताऐवजी श्रीलंका हा पर्यायी यजमान देश म्हणून आयसीसीला सुचवावां, असं सरकारने सरकारने म्हटलं आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी बांगलादेशचा संघ भारता येणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.