Team India : मालिकेनंतर मोठा खुलासा! रोहित-द्रविड नाही... तर 'या' दिग्गजांमुळे युवा खेळाडूंना मिळाली संधी

टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4-1 असा विजय मिळवला. विराट कोहली, केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारासारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत बेझबॉलचा धुव्वा उडवला.
Team India : मालिकेनंतर मोठा खुलासा! रोहित-द्रविड नाही... तर 'या' दिग्गजांमुळे युवा खेळाडूंना मिळाली संधी

टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4-1 असा विजय मिळवला. विराट कोहली, केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारासारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत बेझबॉलचा धुव्वा उडवला.

या मालिकेत पाच युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली. यामध्ये देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांचाही समावेश आहे. या दोन खेळाडूंचा संघात समावेश करण्याचा निर्णय रोहित शर्मा किंवा राहुल द्रविड यांचा नसून निवड समिती अध्यक्ष अजित आगकर यांचा असल्याचे या मालिकेनंतर उघड झाले आहे.

Team India : मालिकेनंतर मोठा खुलासा! रोहित-द्रविड नाही... तर 'या' दिग्गजांमुळे युवा खेळाडूंना मिळाली संधी
Ranji Trophy Final रोमांचक वळणावर, शेवटच्या दिवशी विदर्भाला 290 धावा तर मुंबईला 5 विकेटचे समीकरण

सर्फराज खान, ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार आणि आकाश दीप यांनी भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पाटीदार वगळता इतर सर्व खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. आता एका अहवालात असे समोर आले आहे की इशान किशनने मानसिक थकव्याचे कारण देत दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतून माघार घेतल्यानंतर संघ व्यवस्थापनाने बॅकअप कीपर म्हणून जुरेलचे नाव सुचवले होते.

Team India : मालिकेनंतर मोठा खुलासा! रोहित-द्रविड नाही... तर 'या' दिग्गजांमुळे युवा खेळाडूंना मिळाली संधी
IPL 2024 : KKR साठी वाजवली धोक्याची घंटा; कर्णधार Shreyas Iyer सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर? मोठे कारण आले समोर

खरंतर, भारत दीर्घकाळापासून यष्टिरक्षकांच्या कमतरतेशी झुंजताना दिसत आहे. केएल राहुलबद्दल आधीच ठरले होते की तो फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत केएस भरतशिवाय संघाकडे पर्याय नव्हता. आणि संघ बॅकअप कीपरच्या शोधात होता, जो ध्रुव जुरेलवर संपला. भारतीय संघ निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी जुरेलचे नाव सुचवले होते.

Team India : मालिकेनंतर मोठा खुलासा! रोहित-द्रविड नाही... तर 'या' दिग्गजांमुळे युवा खेळाडूंना मिळाली संधी
Ranji Trophy : विदर्भचा लढा कौतुकास्पद मुंबईच्या तुषार देशपांडेचे मत

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये केएस भरत अपयशी ठरल्यानंतर ध्रुवला राजकोट कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. संघ व्यवस्थापनाने दिलेल्या या संधीचा फायदा घेण्यासाठी त्याने कोणतीही कसर सोडली नाही आणि पदार्पणाच्या सामन्यात 45 धावा केल्या. त्याचवेळी चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावात 91 धावा केल्या तर दुसऱ्या डावात 36 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले.

विराट कोहली आणि केएल राहुलच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला धाकड फलंदाजाच्या शोधात होते. कर्णधार आणि प्रशिक्षकाने आधी रजत पाटीदारला संधी दिली मात्र तो फलंदाजीत विशेष काही दाखवू शकला नाही.

दुसरीकडे, सर्फराजने इंग्लंडकडून याआधीच पदार्पण केले होते. अशा परिस्थितीत शेवटच्या सामन्यात देवदत्त पडिक्कलला संधी मिळाली, ज्याने आपल्या स्फोटक कामगिरीने निवड समितीचा निर्णय योग्य ठरवला. धरमशाला कसोटीत त्याने 65 धावांची दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com