

Qamran Iqbal | Ranji Trophy Final
Sakal
Qamran Iqbal Journey for Ranji Trophy 2025-26 Final: जम्मू-काश्मीरने रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामाचे विजेतेपद जिंकून इतिहास घडवला. पारस डोगराच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीर रणजी ट्रॉफी जिंकणारा २१ वा संघ ठरला. त्यांच्या विजयात अनेक खेळाडूंचे योगदान राहिले. अकिब नबी त्यातील एक, ज्याने या हंगामात ६० विकेट्स घेतल्या.
कर्नाटकविरुद्ध हुबळीमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) आणखी एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधले, तो खेळाडू म्हणजे सलमीवीर कामरान इक्बाल (Qamran Iqbal). त्याने अंतिम सामन्यात दुसऱ्या डावात ३११ चेंडू खेळताना १६ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १६० धावा केल्या.