Mohammad Kaif : वर्ल्ड कप 2023 मधील पराभवासाठी रोहित-द्रविडला जबाबदार; टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू स्पष्टच बोलला

भारतीय संघ आणि कर्णधार रोहित शर्मासाठी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 हे सर्वात मोठे मिशन होते. मेगा इव्हेंटच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघ ट्रॉफीचा मोठा दावेदार होता.
rohit sharma and rahul dravid odi world cup team india Latest News Marathi
rohit sharma and rahul dravid odi world cup team india Latest News Marathisakal

Mohammad Kaif on World Cup 2023 : भारतीय संघ आणि कर्णधार रोहित शर्मासाठी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 हे सर्वात मोठे मिशन होते. मेगा इव्हेंटच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघ ट्रॉफीचा मोठा दावेदार होता. आणि कर्णधार रोहित शर्मा अॅड कंपनीने उपांत्य फेरीसह सलग 10 सामने जिंकले, परंतु फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. आता माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही यावर आपले मत व्यक्त केले आहे.

rohit sharma and rahul dravid odi world cup team india Latest News Marathi
मुंबई इंडियन्सला धक्का! IPL 2024 मधील सुरुवातीच्या सामन्यांना 'हा' वेगवान गोलंदाज मुकणार

एका मुलाखतीदरम्यान मोहम्मद कैफ म्हणाला की, “फायनल सामन्याआधी मी रोहित शर्मासोबत तीन दिवस अहमदाबाद तिथे होतो. रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड तिथल्या खेळपट्टीवर सतत लक्ष ठेवून होते. त्याने खेळपट्टीवरही बराच वेळ घालवला. खेळपट्टीचा रंग दर दिवशी बदलत होता. खेळपट्टीवर गवत आणि पाण्याची कमतरता होती. ऑस्ट्रेलियाला संथ खेळपट्टी द्यावी, असा भारताचा विचार होता. जे पुढे भारतावरच ओझे बनले.”

rohit sharma and rahul dravid odi world cup team india Latest News Marathi
R Ashwin: 'आयुष्यभर धोनीचे उपकार विसरणार नाही...', कॅप्टन कूलबद्दल बोलताना अश्विन झाला भावूक

कैफ पुढे म्हणाला की, “खेळपट्टीवर गवत आणि पाणी नसल्यामुळे खेळपट्टी खूपच संथ झाली होती. ते खरे आहे. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क वेगवान गोलंदाजी करतात. क्युरेटरने आपले काम चोख बजावल्याचे लोक म्हणाले होते. आम्हीही काही बोललो नाही. तुम्ही सतत खेळपट्टी पाहत असताना, तुम्ही क्युरेटरशी संवाद साधला पाहिजे. तुम्ही फक्त दोन ओळी म्हणाल्या की खेळपट्टीला पाणी देऊ नका आणि गवत कमी करू नका.”

rohit sharma and rahul dravid odi world cup team india Latest News Marathi
IPL 2024: 'हार्दिकला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही...', गुजरातचा कोच नेहराची स्पष्टच सांगितलं; बाकी संघांनाही दिला इशारा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी जुन्या खेळपट्टीचा वापर करण्यात आला होता. हा सामना त्या खेळपट्टीवर खेळला गेला ज्यावर यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पाहायला मिळाला होता.

त्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघाला मधल्या षटकांमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मदत मिळाली आणि कांगारू संघाने 47 षटकांत 241 धावांचे लक्ष्य गाठले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com