
भारताचा स्टार क्रिकेटपटू कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय संघाला जून २०२५ मध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे.
या मालिकेपासून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ या नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. या नव्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी रोहितने कसोटीतून अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्याने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे आता रोहित केवळ वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना दिसणार आहे.