

England Cricket Team
Sakal
Sam Curran on India vs England T20 WC Semifinal: सलग तिसऱ्या स्पर्धेत उपांत्य फेरीत आम्ही एकमेकांविरुद्ध लढणार आहोत. त्यामुळे गुपित काहीच नाही. चुरशीचा सामना होईल, असे मत इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याने टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) गुरुवारी होणाऱ्या भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्याबाबत व्यक्त केले.
२०२२, २०२४ मधील टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतही भारत-इंग्लंड (India vs England) उपांत्य सामने झाले होते. त्यात २०२२ मध्ये इंग्लंडने १० विकेटने, तर २०२४ मध्ये भारताने ६८ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता तिसरी लढत कोण जिंकणार, याची उत्सुकता वाढली आहे.