
मुंबई: पुढील महिन्यात होणाऱ्या दुलीप करंडक स्पर्धेसाठी पश्चिम विभागाचा संघ जाहीर करण्यात आला असून, मुंबईच्या शार्दुल ठाकूरची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.१५ खेळाडूंच्या या संघात यशस्वी जयस्वाल, सर्फराझ खान आणि श्रेयस अय्यर या मुंबईकरांचाही समावेश करण्यात आला आहे.